पंढरपूरमंगळवेढासोलापूर

मंगळवेढ्याचा दक्षिण भाग दुष्काळाचा तसा चळवळीचा देखील-शिंदे

मंगळवेढा(प्रतिनिधी)तालुक्याचा दक्षिण भाग ज्याप्रमाणे दुष्काळाचा आहे त्याप्रमाणे चळवळीचा आहे.याच भागात नवोदित सरपंचाचा लोकांच्या प्रश्नाशी संपर्क असल्याने जनतेनी संधी दिली.आता त्यांनी गावाच्या विकासासाठी मोठे योगदान द्यावे असे आवाहन जलसंधारण विभागाचे लेखा अधिकारी अजित शिंदे यांनी केले.

 तालुक्यातील भाळवणी येथे कमल खांडेकर (हिवरगाव), लक्ष्मण गायकवाड (भाळवणी), कृष्णाबाई चौगुले (जालीहाळ), बिरूदेव घोगरे (निंबोणी) या नवोदित सरपंचांचासह ग्रामपंचायत सदस्याच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.                        यावेळी विष्णु चौगुले, छत्रपती परिवाराचे सुरेश पवार, उद्योगपती हनुमंत दुधाळ, पाणी चळवळीचे पांडुरंग चौगुले, जोतिबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश शिंदे, विकास साखरे, समाधान काटकर, सारंग लिगाडे, नामदेव चौगुले,सचिन इंगळे,तात्या काटकर,महादेव धोत्रे,सविता कांबळे, कांचन आवळेकर,रंजना माने,ज्ञानेश्वर पाटील,विजय जाधव,जगन्नाथ कर्वे, श्रीकांत निकम आदी उपस्थित होते.                                                               यावेळी बोलताना लेखाधिकारी शिंदे म्हणाले की, थेट निधीमुळे सरपंचांना काम करण्यासाठी भरपूर वाव आहे.सध्या ग्रामीण भागातील मुले स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करत असताना या नवोदित सरपंचांनीही ग्रामीण भागातील या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी लोकसहभाग सोबत घ्यावा.छत्रपती परिवाराचे सुरेश पवार म्हणाले की, ग्रामीण भागात विकासाचे काम करताना काही वेळेला विरोधकाकडून केलेल्या आरोपाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मिळणारा विकास निधी त्यातून सरकार कडून होणारी कर कपात त्यावेळी प्रत्यक्षात हातात येणारा निधी आणि त्यातून होणारे काम याची तुलना करता सत्ताधारी गटावर विरोधकांकडून अनेक प्रकारचे आरोप केले जातात.अशावेळी आलेला निधी झालेली करपकपात त्यातून झालेले काम यांची माहिती लोकांना द्यावी.जेणेकरून सरपंच व सदस्य काय काम करतात याची माहिती लोकांना होईल चांगले काम करणाऱ्यावर नेहमी आरोपाला सामोरे जावे लागते. त्याकडे दुर्लक्ष करून विकासाचे काम करावे असे आवाहन केले. प्रास्ताविकात पांडुरंग चौगुले यांनी  यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून किती सकारात्मक बदल घडत आहेत असे सांगत व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केलेले विधायक उपक्रम सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय साखरे यांनी केले तर आभार प्रा. भालचंद्र काटकर यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close