क्राइमपंढरपूरमंगळवेढासोलापूर

‘वरिष्ठा पर्यंत चिरीमिरी पोहोचवण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांचा बळी!

त्या' ग्रामविकास अधिकाऱ्याच्या लाच प्रकरणी वरिष्ठांची चौकशी होणार का? पंचायत समिती आवारात चर्चेला उधाण...

मंगळवेढा(प्रतिनिधी) 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होत असून तो निधी ग्रामसेवक व सरपंचाला खर्च करण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मंजूर कामांची बिले ही ग्रामपंचतय मार्फतच अदा होत असतात मात्र खात्यावरून पैसे काढण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे त्यांची परवानगी घेण्यासाठी पंचायत समितीच्या कारभारात ग्रामसेवकामार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होत असल्याच्या चर्चा असून लाचलुचपत ने पकडलेल्या त्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या प्रकरणात वरिष्ठांचीही चौकशी होणार असल्याची चर्चा पंचायत समितीच्या आवरात होवू लागली आहे.
मंगळवारी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल खात्यात जमा केल्याचे बक्षीस म्हणून एक लाखाची लाच मागणाऱ्या गोपीचंद दादा गवळी या ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून ताब्यात घेतले आहे या कारवाईनंतर पंचायत समितीमध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते 15 व्या वित्त आयोगात केंद्र शासनाचा निधी ग्रामपंचायतच्या खात्यावर थेट येऊ लागल्यामुळे ग्रामपंचायती सक्षम झाल्या आहेत 15 लाखापर्यंत ग्रामपंचायत कामे करते तर बाकीच्या कामाचे ऑनलाइन टेंडर करून कामे केली जातात पण ही बिले काढण्यासाठी गटविकास अधिकारी यांची परवानगी घेऊन मगच सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त डीएसस्सी मार्फत ऑनलाइन प्रणालीद्वारे बिले सोडली जातात. पैशाच्या परवानगीसाठी साहेबाना टक्केवारी द्यावी लागते म्हणून काही ग्रामसेवकाकडून ठेकेदारांची अडवणूक करून पैसे मागितले जातात नियमानुसार कामं करून पुन्हा टक्केवारीही द्यावी लागत असल्यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदारांना शेवटी या मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणी सापडलेला ग्रामविकास अधिकारी हा केवळ बळीचा बकरा असून सर्रास असे प्रकार सुरू असून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ पध्दतीने काही ठिकाणी कामे सुरू असल्याचे समजते, सध्या पंचायत समितीचा कार्यकाल संपल्यामुळे प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी काम पाहत असून त्यांच्यावर लोकप्रतिनिधींचा कोणताही वचक नाही.अनेक प्रकारच्या वर्गणी देऊन ग्रामसेवक मेटाकुटीला आल्याच्या चर्चा होत आहेत सध्या पंचायत समिती भ्रष्टाचाराचे कुरण होऊ लागल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे त्यामुळे काल बक्षिसाच्या स्वरूपात लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याने नेमकं बक्षीस स्वतःसाठी मागितलं की वरच्या साहेबांसाठी? याची चौकशी होणार का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close