भारतनानांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणारी विधानसभा पुर्ण ताकदीने लढणार-भगीरथ भालके

मंगळवेढा(प्रतिनिधी)तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी जे स्वप्न स्व. भारतनानांनी पाहिले ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणारी विधानसभा निवडणूक आर या पार पद्धतीने मी खेळणार असल्याचा सुचक इशारा बी.आर.एस नेते भगीरथ भालके यांनी दिला.
स्व.आ. भारत भालके यांच्या 64 वी जयंती व त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती भुजंगराव पाटील हे होते यावेळी दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, डॉक्टर प्रणिता भालके जेष्ठ नेते रामचंद्र वाकडे, अजित जगताप,मुरलीधर दत्तू, मारुती वाकडे, ज्ञानेश्वर भगरे,प्रवीण खवतोडे, दयानंद सोनगे, बसवराज पाटील, नितीन पाटील,भारत बेदरे, शंकर माळी,भारत नागणे, गुलाब थोरबोले, काका डोंगरे, अशोक माने, परमेश्वर लेंडवे, अजित यादव यांच्यासह भालके समर्थक उपस्थित होते. पुढे बोलताना भालके म्हणाले की, विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मला लाखापेक्षा अधिक मते मिळाले मात्र या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वतः स्वीकारून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तयार आहे.2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ अनुशेष च्या नावाखाली पाणी मिळत नव्हते मात्र निवडणुकीनंतर स्व. नानांनी पाणी कागदावर आणून दाखवण्याचे काम केले. त्यांच्या अकाली निधनानंतर देखील या पाण्यासाठी मी प्रयत्न केले पाणी योजना मंजूर आहे की नाही हेच समोर येत नाही अजून एक थेंब देखील तालुक्याला मिळाला नसताना देखील फुले उजळण्याचा कार्यक्रम घेतला गेला. तालुक्यातील विषबाधेचा प्रश्न विधानसभेत न मांडता मुंबईतील विषबाधाचा प्रश्न विधानसभेत लोकप्रतिनिधीकडून मांडला गेला या पुढील तालुक्यातील जनतेला होणाऱ्या अडवणुकीबाबत वाचा फोडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे ताकद कशी वापरायची हे देखील याचे आपल्याला ज्ञान असून बी आर एस चा आदेश येईपर्यंत मी मोकळा आहे. भविष्यातही तुमच्या कामासाठी तुमच्या सोबत कायम राहणार आहे यावेळी अजित जगताप यांनी निवडणुकीपूर्ती राजकारण करणारे स्व. भालके होते सामान्य कुटुंबातून येऊन देखील वेगवेगळ्या पक्षातून तीन निवडणुका लढवून ते लोकाबरोबर राहिले सध्याच्या काळात प्रश्नासाठी होणाऱ्या आडवणूकी बाबत या पुढील काळात आपण बोलणार आहे. यावेळी रामचंद्र वाकडे, भारत बेदरे,,यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन अजित यादव यांनी तर आभार गुलाब थोरबोले यांनी मानले