मंगळवेढाशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मिडिया पासून दूर राहावे-तहसीलदार मदन जाधव

इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मंगळवेढा (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मिडियापासून दूर राहावे व पुस्तकाचा वापर करून अभ्यास करावा. असे मत मंगळवेढाचे तहसीलदार मदन जाधव यांनी व्यक्त केले. ते इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ,मंगळवेढाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम,संस्थेच्या ऍडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम, संचालिका तेजस्विनी कदम, खजिनदार राम नेहरवे, संचालक अॅड शिवाजी पाटील, प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने आदीजण उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तहसिलदार मदन जाधव म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षा हा एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षांचा पाया असतो.पालकांनी या परीक्षेला पाल्यांना तयार करावे.परीक्षा कोणतीही असो सर्व विषय समजून घेऊन दिलेला अभ्यास दररोज नियमित वेळेवर विद्यार्थ्यांनी करावा. जास्तीत- जास्त पुस्तकांचा वापर करावा. तसेच आई-वडील व गुरुजनांचा आदर करावा. आयुष्यामध्ये ध्येय मोठे ठेवाल तर यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचाल.
डॉ.मिनाक्षी कदम म्हणाल्या, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून ज्ञानमानाचे कार्य शिक्षक करत असतात विद्यार्थी असतील तर शाळेला महत्त्व आहे. शिष्यामुळे गुरुला महत्त्व असते. गुरु असल्यामुळे शिष्यांना ज्ञान मिळते. शिष्य असल्यामुळे शाळेची शोभा वाढते, शाळेची शोभा वाढल्यामुळे नगराची शोभा वाढते आणि नगराची शोभा वाढल्यामुळे सर्वांचा विकास होतो. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास केला जातो यासाठी प्रशाला नेहमीच तत्पर असते.
रवींद्र काशीद म्हणाले,विद्यार्थ्यांचे श्रम शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. प्रशाला वर्षभर विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत असतात.तसेच क्रीडा क्षेत्रात ही अनेक विद्यार्थी यश मिळवत आहेत.दिवसें दिवस शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढत चाललेला आहे.
विद्यार्थी समर्थ मासाळ यांनी सांगितले की , गणित विषय अवघड असुन आमच्या प्रशालेतील गणिताचे भास्कराचार्य सतिश सावंत सरांनी खुप सोपा करुन शिकवला. इंग्लिश विषय शिवाजी भोसले सरांनी आत्मियतेने शिकवला, बुद्धीमत्ता सारखा किचकट विषय सोप्या पद्धतीने विशाल माने सरांनी शिकवला तसेच मराठी विषय सोपा आहे परंतु त्यातील गोडी आणखी वाढवण्याचे काम नर्गिस इनामदारम मॅडम यांनी केले.आमच्या यशाचे सारे श्रेय गुरुजनांना आहे. शिक्षकांनी दिलेली शिक्षणाची शिदोरी आयुष्यभर आम्हाला उपयोगी पडत असते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेशमा गुंगे व विद्या रामगडे यांनी केले तर आभार सुहास माने यांनी मानले

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close