
मंगळवेढा(प्रतिनिधी)’ध्यान प्राणायम व आहार’ या त्रिसुत्रीच्या माध्यमातून आपले आरोग्य चांगले ठेवणेसाठी आचार्य नारायण गुरुजींचे मार्गदर्शन व्याख्यान दि,२६ रोजी सांय ६.३० वा. ठेवण्यात आल्याची माहिती कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी दिली. प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र, कोल्हापूर व धनश्री परिवार, मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने दि.२६ फेब्रुवारी रोजी सांय ६.३० वा. लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, किल्ला भाग, मंगळवेढा येथे मोफत मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन केले आहे. सदर व्याख्यानात आचार्य नारायण गुरुजी आनंदी जीवन जगण्याचे अनेक मार्ग सांगणार आहेत. तसेच त्यांच्या व्याख्यानातून वजन कमी करण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र( उंची नुसार २ ते १० किलो वजन कमी ), वजन वाढविण्याचे शास्त्र( उंची नुसार वजन कमी असल्यास ), शुगर,बीपी, यापासून मुक्ती, निरोगी शरीर व आनंदी मन, १००% रोग प्रतिकार शक्ती वाढते, नैराश्य,चिंता,भीती,राग यापासून मुक्ती. संपूर्ण शरीर शुद्धिक्रिया, वात-पित्त-कफ यापासून मुक्ती, प्राणायाम ध्यान आहार याचे सखोल अभ्यास, मुतखडा, दमा,त्वचारोग, मणक्याचे विकार, गुडघेदुखी, शारीरिक व्याधी आदि विषयावर आचार्य सखोल मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आहवान धनश्री परिवाचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.