“मनुष्यजीवन रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडण्यासाठी नाही.”-सुनिल पवार

मिरज(प्रतिनिधी)मनुष्यजीवन हे रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्युमुखी पडण्यासाठी नसुन भौतिक कर्तव्ये पार पाडुन सदगुरूचा शोध घेऊन आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असे आवाहन आयुक्त सुनिल पवार यांनी केले.
सतगुरू चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली यांच्या वतीने मिरज येथील बालगंर्धव नाट्यगृह, व मिरज येथे 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ आणि रस्ता सुरक्षा प्रबोधन हा समारंभ घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी हे होते. प्रमुख पाहुणे सुनिल पवार,आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि प्रमुख उपस्थिती डॉ. डी टी पवार, से. नि. प्रादेशिक परिवहन अधिकारी, सौ. संगीता खोत माजी महापौर, विजय धुळूबुळू माजी महापौर सौ. जईदा इनामदार माजी उपमहापौर, डॉ हर्षवर्धन पोखरकर वरिष्ठ आँकोलॉजिस्ट, प्रशांत साळी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गजेंद्र कल्लोळी ह्यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक नागरगोजे राजेंद्र, माने ए डी,राजीव कुलकर्णी इ.ची उपस्थिती होती. सदर प्रसंगी अंबालाल देशमुख, नितिश पवार,अध्यक्ष सतगुरू चॅरिटेबल ट्रस्ट ह्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यासपिठांवरील मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाहिर विभुते यांनी रस्ता सुरक्षा नियमांसंदर्भात गाण्यातून प्रबोधन केले. डॉ. डी. टी. पवार यांनी 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक करताना रस्ता सुरक्षा संदर्भात प्रबोधन केले. विद्यार्थीनी घरातील शिस्त, रस्त्यावरील, शिस्त व शाळेतील शिस्त पाळण्यासंदर्भात आवाहन केले. त्याचप्रमाणे रस्त्याचा वापर करताना रस्त्यावरील विविध सिग्नल्स आणि नियम पाळण्यासंदर्भात सभागृहात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शिस्त पाळण्याबाबत सांगुन, रहदारीचे नियम पाळण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे 18 वर्षावरील मुलांनीच लायसन्स काढुन वाहन चालवावे असे आवाहन केले. सदर प्रसंगी विद्यार्थ्यांनी सभ्यता, संयम, एकाग्रता, जबाबदारीची जाणीव आणि आत्मविश्वास हे गुणधर्म अंगीकारण्यास सांगितले. त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षेबाबतचे नियमांचे पालन न केल्यास नाहक जीवन गमवावे लागेल याची जाणीव करून दिली. त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी वाहनांना आवश्यक पार्किंग उपलब्ध करून देणे आणि खराब रस्त्यांची वेळीच दुरुस्ती करणे, वाहतुकीची चिन्हे सुस्थितीत आहेत त्याबाबतची खातरजमा करणेबाबत संबंधितांना निर्देश देण्याबाबत ग्वाही दिली.
उपस्थित मान्यवर मा. महापौर मा. आयुक्त, मा. माजी महापौर आणि संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करताना शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि “Safe Travel” हे रस्ता सुरक्षा नियमांचे पुस्तक देण्यात आले.आभार मनोहर कुरणे यांनी मानले.