मंगळवेढामहाराष्ट्रशैक्षणिक

तब्बल 26 वर्षांनी दुरावलेल्या वर्गमित्रांची झाली भेट; जुन्या आठवणींना दिला उजाळा; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहत संपन्न

मंगळवेढा-अनेक वर्षे एकमेकांपासून दूर गेल्यावर माणसाची किंमत कळते. त्यांच्यामधील आपुलकी, जिव्हाळा, प्रेम हे तेव्हाच उमगते. अगदी अशाच प्रसंगास सामोरे जाण्याची वेळ मंगळवेढा येथे 26 वर्षापूर्वी एकत्र शिक्षण घेतल्यानंतर एकमेकांपासून दुरावलेल्या मित्रांवर आली. निमित्त होते मंगळवेढा श्री संत दामाजी हायस्कुल येथील 1996-97 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे 1996-97 मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेनंतर आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या वर्गमित्रांची तब्बल 26 वर्षांनी श्री संत दामाजी महाविद्यालय येथील नियोजित ठिकाणी गळाभेट झाली.                                                                शालेय जीवनातील टोपण नावाने हाका मारत व शाळेतील  आठवणींना उजाळा देत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा अविस्मरणीय केला.                                                                                 या स्नेहमेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रतनचंद शहा बॕकेचे चेअरमन राहुल शहा,यादवराव आवळेकर,किसन गवळी अॕड. रमेश जोशी ,सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय धुमाळ यांच्यासह श्री संत दामाजी हायस्कुलचे गुरुजन वर्ग माजी मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला पट्टनशेट्टी,मुख्याध्यपक सुरेश कोडग,माजी मुख्याध्यापक रामचंद्र कापशेकर,राजेंद्र जाधव,संजय कट्टे,डि.एम माने,दिलीप माने,सोपान चव्हाण,मोहन विभुते,सुनील रत्नपारखी,अनिता मोरे, पी.टी जगताप,पवार मॕडम,बाळासाहेब चेळेकर.सुरेश राजमाने,सुभाष यादव,उपस्थित होते.                                                                  मधु स्वामी यांनी जुन्या मित्रांच्या स्नेहमेळाव्याची संकल्पना मांडल्यानंतर वर्गमित्रांसह इतर सहकारी मित्रांनी या सुखद कार्यक्रमास होकार देत एकमेकांशी संपर्क साधला. एकंदर या प्रक्रियेस जेमतेम काही दिवसांचा कालावधी जाऊ द्यावा लागला. व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने केले.राज्यातील विविध शहरांसह,परराज्यात स्थायिक झालेले अनेक गावांतील वर्गमित्र या स्नेहमेळाव्याला हजर होते. ज्या शिक्षकांनी आपल्यावर संस्कार केले त्यांच्याबद्दलचे प्रेम, जिव्हाळा प्रत्येकाच्याच बोलण्यातून व्यक्त होताना दिसून येत होता.                                                                          यावेळी राहुल शहा बोलताना म्हणाले 1996-97 या बॕचच्या स्नेहमेळाव्या प्रसंगी तुम्ही सर्वजण 26 वर्षानंतर एकत्र आलात असेच एकत्र राह अशा शुभेच्छा देत माजी विद्यार्थीमुळे शाळेचा सर्वांगीन विकास कशापध्दीने होतो.शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते आयुष्यभर कसे टिकुन राहत असते.यापुढेही प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात एकत्र येवून आपले स्नेह असेच वाढवा असे मार्गदर्शन केले. मुख्यापक सुरेश कोडग यांनी मनोगत व्यक्त करताना पुर्वीचे हेच विद्यार्थी कसे होते व आज यांना समोर एवढे शांत बसलेले बघुन आश्चर्य वाटते.वयोमानाप्रमाने विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला ओळखण कठीण  होतं.त्यावेळच्या आठवणीमध्ये सर्वजन रममान झालात.यापुढे ही शाळा कशी वाढेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आव्हान केले.                                             विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना संजय काटकर व सुनिता वांढरे यांनी जुन्या आठवणी उजाळा देऊन या पुढील कोणत्या आव्हानना सामोरे जायचं आहे हे सांगितले तसेच मित्र व औषध दोन्ही वेदना दुर करतात पण औषधांना एक्सपायरी असते मित्रांना नाही.
या स्नेहमेळाव्यानंतर अखेर सांगता झाली.यावेळी मधु स्वामी, विनायक निराळे,सतिश सुरवसे,सुर्यकांत कनेरी,महेश ढेकळे,श्रीकांत नाझरकर,आण्णासाहेब इंगळे,बिरा माईनकर,दत्तात्रय येळे,नितिन इकारे,किरण माने,विजय माळी,सिताराम भुसे,अस्लम इनामदार,अविनाश पाटील,आण्णा घोळसंगी,युवराज चिंचकर,संजय पवार,कल्याण पाटील,माधुरी माळी,सविता माळी,शारदा माळी,अर्चना पाटील,सिमा सावंत,दिपाली राजमाने,वंसुधरा बुटे,शैलजा फटे,मंदाकिनी गडदे,राधिका नागणे,उषाराणी ढेकळे,रेश्मा मुजावर, मिनाक्षी हेंबाडे,गुलशन मुजावर,दिपा पट्टनशेट्टी,रुपाली होनराव,दिपाली होनराव,शितल चिंचकर,सविता भगरे आदी उपस्थित होते.                                                        अध्यक्षीय सुचना महादेव धोत्रे,प्रस्तावीक अनिता नागणे सूत्रसंचालन मल्लमा बुगडे तर आभार संजय काटकर यांनी मांडले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close