माझे शरीर साथ देत नाही;तरी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही-मनोज जरांगे-पाटील

मंगळवेढा(प्रतिनिधी) 17 दिवसाच्या आंदोलनाने माझे आज शरीर साथ देत नाही.दररोज सलाईन लावावी लागत असली तरी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे -पाटील यांची मंगळवेढ्यात यल्गार सभा आयोजित केली. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजाच्या मुर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,आंतरवाली येथे मराठा आंदोलनात माता माऊली चार चार महिन्याची लेकरे घेवून बसलो असताना अचानक हल्ला करून माता माऊलीचे डोके फोडून चेहरा दिसत नव्हता इतका विद्रुप केला.त्यात 75 वर्षाच्या वयोवृद्धाला सोडले नाही. लोकशाही पध्दतीने आमचे आंदोलन सुरू असताना हल्ला करण्याचे कारण काय याचे उत्तर सरकारने अद्याप दिले नाही.आमचे आंदोलन मोडण्यासाठी हल्ला घडवून आणला.तो हल्ला महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजावर हल्ला होता.पाच हजार कागदाचा पुरावा सापडल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजाला सकसकट प्रमाणपत्र द्यावे लागेल. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही.मराठा आणि कुणबी एकच असलेले अनेक पुरावे होते.चर्चेसाठी अनेक
मातब्बर नेते पाठविले.त्यांना मराठ्याची पोटजात का होवू शकत नाही,असा प्रश्न विचारताच त्याची बोलती बंद झाली.सगळे निकष मराठा समाजाचे पार केले.गायकवाड कमीशनने मराठा 12 टक्के मागास असल्याचे सिध्द केले. वंशावळी असलेल्याना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा शासन निर्णय घेवून आले. पण वाचल्यावर पण त्यात खुट्टी मारली होती.
आपल्याला आतापर्यंत खूप खेळ खेळलाय. आता तरी भानावर येवू असे आवाहन करत शेवटचा लढा द्यायचा.आता माघार घ्यायची नाही.आरक्षणासाठी 40 वर्षे गेली.आता 40 दिवसाचा वेळ देवू ,जी समाजाची वेदना ती मांडतोय.हे आंदोलन सामान्य मराठ्यानी हातात घेतले असून त्यात दोन गट पाडू शकत नाही.आंतरवालीतील विराट रूप बघून शासनाला निर्णय घ्यावा लागेल.
मी प्रश्न विचारले की साहेबाला विचारून येतो म्हणायचे पण पट्या आलाच नाही..आपण साधा सोपा प्रश्न विचारतो किचकाटत शिरत नाही. पण जातीवंत शेतकऱ्याचा पोरगा असल्याने मला कशाची गरज नाही. समाजच माझे मायबाप,घरातून बाहेर पडताना बायकोचो कंकू पुसून सांगीतलं जगलो तर तुझा नाय जगलो तर समाजाचा. प्रास्तावित सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष माऊली पवार म्हणाले की,मराठा आरक्षणात आंतरवाली घटना घडल्यावर जिल्ह्यात सर्वात जास्त आंदोलने मंगळवेढ्यात झाली.मनोज जरांगे पाटीलांनी मराठा आरक्षणाचा घास अंतीम टप्प्यात आणलाय.14 ऑक्टोबर ला पुर्ण ताकदीने आंतरवली जायचे.सभेचे सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.