
मंगळवेढा(प्रतिनीधी) : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २४ गावच्या सरपंचाच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न गेली पंधरा वर्षे राजकीय व्यासपीठावर तरंगत असून अजून मंजुरी न मिळाल्यामुळे नुकतीच या गावातील सरपंचांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत ही गावे कर्नाटकला जोडण्याची मागणी केली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दुष्काळी गावातील,गोणेवाडी,शिरसी,खुपसंगी,पाठखळ,लेंडवेचिंचाळे,नंदेश्वर,आंधळगाव,लक्ष्मीदहीवडी,रड्डे,येड्राव,हाजापुर,भाळवणी,निंबोणी,जालिहाळ,खडकी,जुनोनी,जित्ती,खवे,सिध्दनकेरी,मेटकरवाडी,या १९ ग्रामपंचायतीचे सरपंच लोकसभा,विधानसभा,जिल्हापरीषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत,या कोणत्याही सार्वजनिक निवडणुकीत एकही नागरीक मतदान करणार नसुन पुर्णता बहीष्कार घालणार असल्याचे ठराव घेवुन शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर गेले.आज सकाळी 7.30 वाजता त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी समवेत भेटून पाणी प्रश्नाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी हैदर केंगार(मरवडे),माधवानंद आकळे(हाजापूर), सुनील थोरबोले(रड्डे), संजय पाटील(येड्राव), बिरूदेव घोगरे (निंबोणी),लक्ष्मण गायकवाड(भाळवणी),सचिन चौगुले(जालीहाळ),ऋतुराज बिले (पाठखळ),भाऊसाहेब गरंडे(नंदेश्वर),गणेश पडवळे(खुपसंगी),श्रीकांत साळे (लक्ष्मी दहिवडी)आधी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नाबाबत सरकार संवेदनशील असून दुपारी जलसंपदा विभागाची बैठक असून त्या बैठकीमध्ये या प्रश्नाच्या संदर्भात जलसंपदा सचिवाकडून माहिती घेऊन या विभागाचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा करुन योजना लवकरच मार्गी लावु असे आश्वासन २४ गावच्या सरपंचाच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले.