
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्यचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून स्त्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे.हे कितपत योग्य आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. स्त्रित्वाचा आदर करून स्त्री सन्मानाचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीदेवी फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि माता रमाईच्या लेकींचा महाराष्ट्र म्हणून अभिमानाने गौरविला जातो. परंतु या आदर्शवत स्त्रियांच्या संस्कारांना काळिमा फासण्याचे काम महाराष्ट्रात होत आहेत.मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून मंगळवेढा राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्या वतीने दामाजी चौकामध्ये रास्ता रोको व सत्तार यांच्या प्रतिमेस जोडो मारो अंदोलन करुन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करून मंत्रीमंडळातून काढुन टाकावे असे निवेदन पोलिस प्रशासनस देण्यात आले. यावेळी कॉग्रेस आय चे तालुकाध्यक्ष अॕड.नंदकुमार पवार,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा,राष्ट्रवादीचे अल्पसंख्याकचे प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संगिता कट्टे,पक्षनेते अजित जगताप यांनी आपल्या मनोगतातुन निषेध व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार खवतोडे,राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी,नगरसेवक प्रविण खवतोडे,राष्ट्रवादी महिला शहरध्यक्षा स्मिता अवघडे, दामाजीचे संचालक मुरलीधर दत्तु,अरुण किल्लेदार,मारुती बापु वाकडे,बजरंग ताड,सोमनाथ बुरजे,हर्षद डोरले,विक्रम शेंबडे,विनायक दत्तु,नाथा ऐवळे,बापु अवघडे,सुनिता अवघडे,मंदाकिनी सांवजी,संध्या काटकर,माधुरी हजारे,सुनिता मेटकरी,अदि महिला व कार्यकर्ते उपस्थिती होते.