जी-२० गटाचे अध्यक्षपद मिळणेही भारतासाठी मोठी संधी-पंतप्रधान मोदी

गौरीशंकर बुरकुल संपर्क कार्यालय येथे "मन की बात कार्यक्रमाचे आयोजन!

मंगळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी आपल्या संपर्क कार्यालय येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रमाचे नियोजन केले होते.                                                                                              यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात माध्यमातून चालू घडामोडीवर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात भारतच्या कार्यशैली वर बोलताना म्हणाले की भारत येत्या १ डिसेंबर रोजी जी-२० सामर्थ्यशाली गटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. अध्यक्षपद मिळणे खूप मोठी संधी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जगाचे हित साधण्यासाठी तसेच शांतता, ऐक्य, पर्यावरण, शाश्वत विकास यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर योग्य तोडगा काढण्यासाठी जी-२०च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले की सामर्थ्यशाली जी-२० गटाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत सूत्रानुसार काम करणार आहे. गटाच्या देशांमध्ये जगातील लोकसंख्या आहे.अमृतमहोत्सवी काळात भारताला जी. २०चे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. असेही मोदी म्हणाले.

तेलंगणातील लोकांचे केले विशेष कौतुक!
नागा संस्कृती टिकून राहावी म्हणून नागा लिडी- क्रो-यू संस्था स्थापन केली आहे. उत्तर प्रदेशमधील गावामध्ये जतीन ललित सिंह यांनी दोन कम्युनिटी लायब्ररी व रिसोर्स सेंटर सुरू केले आहे. झारखंडमधील काही जिल्ह्यात काम करण्यासाठी संजय कश्यप यांनी ग्रंथालयाची स्थापना केली. सर्व व्यक्ती. संस्था यांच्या प्रयत्नांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात खास उल्लेख केला                                                                                                                                                      यावेळी मन की कार्यक्रम पाहण्यासाठी मन की बात चे जिल्हा समन्वयक संतोष,भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष औदुबर वाडदेकर,भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,शहरध्यक्ष गोपाळ भगरे, किसान सेलचे विजय बुरकुल,अशोक माळी,बबलु सुतार,सागर ननवरे,सुरज जाधव,साईनाथ शिंदे यांच्या अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते

 

 

 

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.