अखेर विठ्ठल कारखान्यावरील जप्ती मागे; फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाला देणार पाठिंबा -अभिजीत आबा पाटील

पंढरपूर(प्रतिनिधी)राज्य सहकारी बँकेने डी.आर.डी न्यायालयात त्यांचे म्हणणे मांडल्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई टळली आहे.यामुळे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुन्या संचालक मंडळांन घेतलेल्या कर्ज वसूल करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला हाेता. यामध्ये बँकेने साखरेचे गोडवूनसह इतर मालमत्ता ताब्यात घेतली हाेती. या जप्तीच्या कारवाई नंतर पंढरपुरात राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीला साेडचिठ्ठी दिली. अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला. अभिजीत पाटील म्हणाले 342 कोटी रुपये थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बॅंकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली हाेती. डी.आर.डी न्यायालयात बॅंकेने म्हणणे सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर जप्तीची कारवाई रद्द झाली आहे.
दरम्यान उद्या आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल साखर कारखान्यावर भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची माहिती अभिजीत पाटील यांनी दिली.