
मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले असून टँकर मागणीची प्रस्ताव देऊन देखील टँकर देण्यासाठी प्रशासन स्थळ पाहणी व प्रस्तावातील त्रुटीच्या नावाखाली चालढकल करत असून प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून मंगळवेढा तालुक्यातील चोखाबा सामाजिक संस्थेने स्वतःच्या खर्चातून तालुक्यातील वाड्यावस्त्यांवरील अकरा गावांना पाण्याचे टँकर सुरू केले आहे यामुळे तालुक्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यामध्ये दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत असते.ही परिस्थिती घेता प्रशासनाने जानेवारी महिन्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाई आराखडा तयार करून त्या संदर्भातील उपाययोजना करणे अपेक्षित होते परंतु याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याने ग्रामीण जनतेला पाणी पाणी करावे लागत आहे.आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप सुरू असून काम पूर्ण न झाल्यामुळे आंधळगाव,गणेशवाडी येथून टॅकरची मागणी आली.भोसे प्रादेशिक योजनेतील शिरनांदगी,भोसे, निंबोणी, हाजापूर, हिवरगाव, भाळवणी, सोड्डी,नंदेश्वर या गावानेही पाण्याच्या टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले. याबाबत 22 मार्च रोजी प्रशासनाने स्थळ पाहणी देखील केली. मात्र अद्याप टँकर सुरू केला नाही.भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी सातत्याने खंडित असून आठ दिवसातून एकदा पाणी येत आहे तेही गावठाणात मात्र वाडी वस्तीवरील जनावरे आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु प्रशासनाने टँकर मागणीचे अद्याप पुर्तता न केल्यामुळे केल्याचे वृत्त दैनिक सकाळ मधून आजच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते या वृत्ताचे दखल घेत आज शिरनांदगी, मानेवाडी, निंबोणी, पोट, सलगर (बु), सलगर (खू), जंगलगी, बावची ,रड्डे जित्ती अश्या ११ गावात हे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले.
दुष्काळाची दहाकता लक्षात घेऊन सामाजिक उपक्रम!
प्रशासनाकडून टँकर देण्याकडे विलंब होत असल्यामुळे सध्या तालुक्याच्या दुष्काळी भागात जनतेचा पाण्यासाठी सुरू असलेला रोष लक्षात घेता दुष्काळी जनतेची तहान भागवण्याच्या दृष्टीने आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही अकरा गावात टँकर सुरू करण्याचा प्रयत्न केला तसेच चैत्र यात्रे निम्मित यात्रेकरू ना मागणी नुसार टँकर देऊ!
प्रशांत साळे अध्यक्ष चोकोबा सामाजिक संस्था मंगळवेढा