मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसह प्रलंबित प्रश्नासाठी अभिजीत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट!

मंगळवेढा(प्रतिनिधी) शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसह मंगळवेढात रखडलेल्या इतर प्रश्नाला मंजुरी द्यावी या मागणीचे निवेदन विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मुंबई येथे केली.
विठ्ठल कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना विधानसभेचा संभाव्य उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय हालचालीला वेग आला अशा परिस्थितीत त्यांनी या मतदारसंघातील प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या १३ प्रश्नाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर नुकतेच आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनातील बहुतांश मागण्या या तालुकास्तरावरील होत्या. तर काही प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी पुढाकार घेतला.यापूर्वी याच प्रश्नासाठी गत आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्या मागण्याची निवेदन दिले.त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पुन्हा त्याच मागण्याचे निवेदन दिले. 2014 पासून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम रखडले. त्यामध्ये पाणी व गावे कमी करणे.तर पुन्हा पाणी, गावे पुर्ववत ठेवणे, पुन्हा सर्वेक्षण यामुळे या कामाला सुरुवात झाली नाही. सध्या या योजनेचा प्रस्ताव मे मध्ये शासन दरबारी सादर झाला आहे. या योजनेस मंजुरीसह निधी उपलब्ध करावा. सध्या तालुक्यातील नदीकाठचा ऊस चा-यासाठी वापरला जात आहे. तो ऊस जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात. महात्मा बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न गेले अनेक वर्ष राजकीय व्यासपीठावर तरंगत आहे. महाविकास आघाडी सरकारने स्मारकासाठी आवश्यक निधीची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात या कामाला निधी उपलब्ध नसल्याने सुरुवात झाली नाही. या प्रश्नाला मंजुरी द्यावी.नदी व कालव्यातून पाणी सोडण्यात यावे.वीजपुरवठा खंडित करू नये याही मागण्याचा यामध्ये समावेश आहे.