पाण्यासाठी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीच पाण्यापासून वंचित का ठेवले?हे पाप कुणाचे?-आरोग्यमंत्री तानाजी सांवत

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुका अजूनही पाण्यासाठी तहानलेला आहे मात्र याच पाण्यासाठी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीच या भागाला पाण्यापासून वंचित का ठेवले ? हे पाप कुणाचे ? आम्ही उकरंडा उकरत नसल्याने सांगून महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गतिमान होत असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.
धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी,धनश्री मल्टीस्टेटच्या तपपुर्ती,व संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी खा.धनंजय महाडिक हे होते,व्यासपीठावर भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष शिवाजीराव सावंत, धनश्रीचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे, धनश्रीच्या अध्यक्षा शोभाताई काळुंगे,दिपाली पाटील,दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील,उपाध्यक्ष तानाजी खरात,भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत,जकरायाचे शुगर बिराप्पा जाधव,प्रणव परिचारक,शहराध्यक्ष प्रतिक किल्लेदार,अॅड सुजित कदम,डाॅ मिनाताई कदम,पवन महाडिक,धनश्री पतसंस्था व मल्टिस्टेट व दामाजी कारखान्याचे संचालक उपस्थित होते.यावेळी तालुक्यातील कर्तृत्ववान महिलामध्ये क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले,सिताराम कारखान्याच्या सी.ओ. राजलक्ष्मी गायकवाड,सुशिला संकपाळ,सुजाता लोहकरे,अनुष्का शिकतोडे आदीसह धनश्री मलिस्टेटच्या माजी संचालकाचाही सत्कार करण्यात आला.ग्रामीण भागातील 75 गोरगरीब महिलाना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की,मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे 7 टी एम सी पाणी नेत असताना तुमच्यातील पाणी नेत नाही.राज्यात सत्तांतर केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाच 11 हजार कोटीचे बजेट टाकल्याने त्यामधून या योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे हे मी कागदावर बोलत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले.सत्तांतर झाल्यापासून आरोग्य मंत्री म्हणून काम करत असताना राज्यातील बारा कोटी जनतेच्या आरोग्याचा विचार करून त्यांना मोफत उपचार करून देण्यासाठी राईट टू हेल्थ कायदा लवकरच आणणार असल्याचे सांगत जनतेच्या प्रश्नावरील फायलीवर सही करताना आमच्या मुख्यमंत्र्याचे हात थरथरत नसल्याचा खोचक टोला लगावत पिठाच्या गिरण्यासारखी सोलापूर जिल्ह्यात कारखानदारी वाढली. ऊस आला की कारखाना सुरू, ऊस संपला की कारखाना बंद अशाने कारखानदारी अडचणीत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असून शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक योजना राबविल्याने थेट बँक खात्यावर पैसे जमा होऊ लागले.अध्यक्षपदावरून बोलताना खा.महाडिक म्हणाले की,पतसंस्था काढणे सोपे असले तरी चालविणे फार अवघड आहे.कपाळावर एकही अटी न आणता कारखानादाराला मदत करण्याचे काम धनश्रीने केले.मंगळवेढ्यातील पाणीप्रश्नी गरज पडली केंद्रातून मदत करू.साखर कारखान्याला दहा हजार कोटीचा आयकर माफ करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवाजीराव काळुंगे यांनी 1972 पासून तालुक्यात पाण्यासाठी होत असलेल्या संघर्षाची माहिती दिली प्रास्ताविक मारूती सावंत यांनी केले. सुत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी केले.