
मंगळवेढा(प्रतिनिधी)तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यावर पो.नि.रणजित माने यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत 17 ब्रास वाळू सह 5 लाख 77 हजाराचा ऐवज हस्तगत करून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची फिर्याद पोना ईश्वर सिध्दलींग दुधाळ यांनी दिली.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन उमाजी जाधव रा. घुमेरावाडा वेळापुर, आण्णा भीवा कोकरे रा.ब्रम्हपुरी, सुरेश चौगुले रा शांतीनगर मंगळवेढा,विजय जावळे रा धर्मगांव रोड मंगळवेढा,विजय माने रा.मळोली ता माळशीरस विशाल जाधव रा वेळापुर ता माळशिरस यांनी ब्रम्हपुरी येथील बठाण रोडवरील शेतजमीन गट नं 822/01 मध्ये वाळू साठा करून वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक रणजीत माने,सपोनि बापूसाहेब पिंगळे यांच्या पथकाने यावर आज या साठ्यावर धाड टाकून टाकली असता यामध्ये 17 ब्रास वाळू कि.1 लाख 2 हजार,3 लाख किमतीचा एक स्वराज्य 855 कंपनीचा ट्रॅक्टर क्र.MH24D 1059 ,1लाख 50 हजार किंमतीच्या दोन वाळु काढण्याचा कप्पी,25 हजाराची बजाज कंपनीची प्लॅटीना मोटारसाईकल क्रमांक MH13 AG 3267 असा 5 लाख 77 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला.दोन दिवसापूर्वी तहसीलदार स्वप्निल रावडे यांची करवीर येथे बदली झाल्याचे वृत्त समजल्यानंतर नवीन तहसीलदारांनी पदभार घेण्यापूर्वी वाळूमाफीयाने डोके वर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्क पोलीस यंत्रणेमुळे हा जोर हाणून पडला पोलिसांनी या वाळूमाफीयाच्या मुसक्या आळवत कारवाईची मोहीम तीव्र केले.