आचार्य नारायण गुरुजी यांच्या ध्यान प्राणायाम आहार या त्रिसूत्रीवर आधारित शिबिरांचे 1500 साधकांनी घेतला लाभ!

मंगळवेढ्यातील साधकांने दिला स्वच्छेताचा संदेश!

मंगळवेढा(प्रतिनिधी) प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने मंगळवेढा सुरू असलेल्या  शिबिरातील 85 साधकांनी शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवले.आतापर्यत मंगळवेढा येथील शिबीरामध्ये 14 बँचेसच्या माध्यमातून 1500 साधकांनी लाभ घेतला.

या केंद्राच्या वतीने मार्गदर्शक आचार्य नारायण गुरुजी यांनी ध्यान प्राणायाम आहार या त्रिसूत्रीवर आधारित शिबिर 18 नोव्हेंबर पासून येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय सुरू होते.                                                                                      या शिबिरामध्ये चुकीची जीवनशैली,आहारातील बदलामुळे शरीरावर होणार झालेले दुष्परिणाम, या विषयावर मार्गदर्शन करताना आचार्य नारायण गुरूजी म्हणाले,आपली प्राचीन भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आपण जोपासली पाहिजे.अलीकडच्या काळात आपण पाश्चात्य देशातील लोकांचे अनुकरण करत आहोत. त्यामुळे आपणच आपले आरोग्य बिघडवायला कारणीभूत आहोत. आपल्याच देशातील ऋषीमुनी दीडशे-दोनशे वर्ष जगायचे. परंतु आत्ताचा काळा हा ७०ते ७६ वर्षापर्यंतचा काळ राहिला आहे .पाश्चात्य देशातल्या लोकांनी आहारावर अभ्यास केला.विविध देशातील लोकांच्या आहाराबाबत माहिती जाणून घेतली.त्यावेळी त्यांना भारतीय आहार उत्तम वाटला. म्हणून त्यांनी भारतातील आहार सुरू केला आणि आपण पाश्चात्य देशातील आहार स्वीकारला. त्यामुळे आपले आरोग्य बिघडत गेले.आपल्या शरिरावर अनावश्यक चरबी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक आजारांना आपण आमंत्रण देत आहोत.

प्राणायम,योगासन,व्यायाम व योग्य आहार घेतला तर तुम्हाला कोणताही रोग होणार नाही. तसेच आयुष्यमान दिर्घकाळ राहिल. तसेच महिलांनी मुलांना घडवत असताना आपल्या इच्छा आकांक्षा त्याच्यावर लादू नका आयुष्यात त्याला जे घडायचे आहे ते मुलांच्या इच्छेप्रमाणे करू द्या.व्यायाम प्राणायाम व योग्य आहार याबाबत प्रबोधन आचार्य नारायण गुरुजी यांच्या कडून प्रबोधन केले . पंधरा दिवसाच्या शिबिरातील आठव्या दिवशी शिबिरातील 85 सहभागी साधकांनी आठवडा बाजार, दामाजी मंदिर परिसर, गणेश भाग ,नगरपालिका शाळा, चोखामेळा चौक आदी परिसर स्वच्छ केला.                                                                                                                    या शिबिरामध्ये मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, मारुती बापु वाकडे,मोहन लेंडवे व महिला साधकांने ही आपले अनुभव व विचार व्यक्त केले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.